यशस्वी जीवनाचा मंत्र

यशस्वी मंत्र

सार्वजनिक जीवनात कसे वागावे .....
१) तुमचे धेय्य निश्चित करा. मला काय करायचय, काय व्हायचय, कुठे पोहचायच, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...

२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा. 

3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे.

4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा. 

5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. 
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही 

6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.

7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.

८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.

9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
     १ ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
     २ हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ? 
      ३ हे असच का ?

या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.

10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल 
******
*वयक्तिक जीवनात कसे वागावे ......

१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..

२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच

३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा

४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या 
उदा. देव, महामानव, आईवडील इत्यादी 

५) नाश्ता , जेवन घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.

६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा

७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा

८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.

९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .

१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.

११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका

१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.

१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत 

१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर आभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे 

१५) tv व चिञपटात चांगले ते पहावे.

१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका

१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.

१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा

२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला

२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा

२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा. 
अपयश टाळा. यश स्विकारा.

मी म्हणत नाही की मी सांगतो तेच करा..
पण विचार करा...
पटले तर कृती करा..